रत्नागिरी : वरवडे येथे विवाहितेची आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील वरवडे धनगरवाडा येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत 33 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे.

अनिषा अनिल गोरे (वय 33) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, घरात कोणी नसताना त्यांनी ओढणीच्या सहाय्याने लाकडी बाराला गळफास घेत जीवन संपवल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जयगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *