रत्नागिरी तालुक्यातील वरवडे धनगरवाडा येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत 33 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे.
अनिषा अनिल गोरे (वय 33) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, घरात कोणी नसताना त्यांनी ओढणीच्या सहाय्याने लाकडी बाराला गळफास घेत जीवन संपवल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जयगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















