Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

मंडणगड : शेनाळे घाटात कारचा भीषण अपघात

banner 468x60

मंडणगड जवळच्या शेनाळे घाटात रविवारी रात्री एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. आंबडवे ते महाड-राजेवाडी महामार्गाचे नूतनीकरणाचे काम सुरू असताना, शेनाळे घाटातील चिंचळी धरणाजवळच्या एका धोकादायक वळणावर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगातील एका कारचा भीषण अपघात झाला.

banner 728x90 banner 728x90

सुदैवाने, कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या बॅरिकेड्सवर जोरात आदळली आणि तिथेच थांबली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी, ही कार खोल दरीत कोसळता कोसळता वाचल्याने जीवितहानी टळली, ज्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सदर अपघात रात्री उशिरा घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला चिंचळी धरणाजवळील मोठ्या वळणाचा अंदाज आला नाही. हा वळणमार्ग महामार्ग प्राधिकरणाने रुंद न केल्यामुळे अत्यंत धोकादायक बनला आहे. याच धोकादायक वळणावर ही कार थेट बॅरिकेड्सवर जाऊन धडकली. जर हे बॅरिकेड्स नसते, तर कार थेट खोल दरीत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.


स्थानिक नागरिकांनी या धोकादायक वळणाबाबत महामार्ग प्राधिकरणाला वेळोवेळी सूचना देऊनही कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. सध्या हे वळण दुहेरी वाहतुकीसाठी अत्यंत अयोग्य बनले आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या कामातील त्रुटी आणि वळणाचे धोके समोर आले आहेत.


या गंभीर घटनेनंतर, नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाकडे तातडीने या वळणावर कायमस्वरूपी सुरक्षित उपाययोजना करण्याची आणि रस्त्याच्या कामातील चुका सुधारण्याची जोरदार मागणी केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात या भागात आणखी मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *