Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

रत्नागिरी : लघु पाटबंधारे प्रकल्पात 41 टक्के पाणीसाठा, तीन तालुक्यात टंचाई

banner 468x60

उन्हाचा कडाका वाढला असून, पारा ३७ अंश सेल्सिअवर गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलेली आहे. जिल्ह्यात ४६ लघु पाटबंधाऱ्यांमध्ये ९७.२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक असून, ४१.१३ टक्के साठा आहे. बाष्पीभवनामुळे आठवडाभरात २.८८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा घटल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

banner 728x90 banner 728x90

एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत एकूण ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाला अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. या परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन प्रशासन स्तरावर करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात तीन मध्यम धरण प्रकल्प तर ४६ लघुपाटबंधारे धरण प्रकल्प आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसागणिक तीव्र होत आहेत. वाढत्या उन्हाळ्याच्या तडाख्याने दिवसागणिक पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडू लागली आहे.
सध्या जिल्ह्यात रत्नागिरीसोबतच चिपळूण आणि खेड या तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होत आहे. त्या तीन तालुक्यांतील एकूण १४ गावांतील, ३५ वाड्यांतील १ हजार ९३८ ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

उन्हाची रखरख वाढत असल्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. टंचाईग्रस्त वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन स्तरावरून धावपळ सुरू झाली आहे. यावर्षी सुरुवातीला रत्नागिरी तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले होते.


रत्नागिरीतील पाच गावांतील २५ वाड्यांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर चिपळूण तालुक्यात ७ गावांतील ८ वाड्यांत टँकर धावत आहे. खेडमध्ये २ गावांतील दोन वाड्यांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसागणिक जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. परिणामी, पाणीटंचाई उग्र रूप धारण करण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *