रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा येथील मासेमारी होडी बंदरात परतताना भगवती बंदर येथे समुद्रात बुडाली. मिरकरवाडा येथे ब्रेक वॉटरच्या आतमध्ये बोटीचा अपघात झाला. रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अमीना आयशा असं बोटीचं नाव आहे.
या बोटीवर आठ खलाशी असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. यापैकी सहा खलाशांना स्थानिक मासेमारी बोटीने वाचवले. मात्र दोन खलाशी अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
नौका बुडाल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खलाशांनी एक तास पोहत किनारा गाठण्याचा प्रयत्न केला. अखेर एका स्थानिक नौकेवरील खलाशांनी बुडणाऱ्या सहा खलाशांना बोटीवर घेतले. मात्र अद्याप दोघांचा शोध लागलेला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*