राजापुर : 13 वर्षीय मुलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे एका १३ वर्षीय मुलीचा पंख्याच्या विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. स्वरांगी संदीप गिजम (वय १३, रा. धाऊलवल्ली, गिजमवाडी, राजापूर) असे मृत मुलीचे नाव आहे.

banner 728x90

या घटनेमुळे संपूर्ण राजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना त्यावेळी घडली जेव्हा स्वरांगीच्या घरात कोणीही नव्हते. घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेले होते.

अशावेळी स्वरांगीचा पंख्याच्या वायरला हात लागला आणि तिला विजेचा जोरदार धक्का बसला. घरात कोणीही नसल्याने तिला तातडीने मदत मिळू शकली नाही, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.


या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

एका क्षणात होत्याचे नव्हते झालेल्या या घटनेमुळे गिजम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धाऊलवल्ली गावात शोककळा पसरली असून, निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेने विजेच्या उपकरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *