मुंबईत “कुणबी एल्गार मोर्चा” — ओबीसी आरक्षण बचावासाठी एल्गार

banner 468x60

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि कुणबी समाजाच्या हक्कासाठी “कुणबी एल्गार मोर्चा” काढण्यात येणार आहे. या मोर्च्याचे आयोजन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले असून तालुका वसई शाखेचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

banner 728x90

हा मोर्चा ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदान, मुंबई (CSMT) येथे होणार असून, संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो कुणबी बांधव उपस्थित राहणार आहेत.

मोर्च्याचे उद्दिष्ट ओबीसी आरक्षण टिकविणे, समाजातील मागासवर्गीयांना न्याय मिळवून देणे, आणि शासनाने घेतलेल्या निर्णयांविरोधात संघटित आवाज उठविणे हे आहे.

“आरक्षण हा आमचा घटनात्मक हक्क आहे. कुणबी समाजाला न्याय मिळावा, यासाठी आम्ही मुंबईकडे मोर्चा घेऊन जात आहोत,” असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची तयारी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *