रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, बाईक थेट ट्रकच्या चाकात घुसली

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर होत असलेले अपघात हा मोठा चिंतेचा विषय ठरला आहे.

असाच एक भीषण अपघात सोमवारी रात्री रत्नागिरी जवळ झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंब्याजवळ चरवेली नजिक भीषण अपघात झाला आहे.

banner 728x90 banner 728x90

या अपघातात राहुल आव्हाड (राहणार पनवेल, जिल्हा रायगड) नावाच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. रायगड पनवेल येथे राहुल यांचे लग्न डिसेंबर २०१७ मध्ये झाले होते.

आयटी क्षेत्रात ते काम करत होते. पनवेल परिसरात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. या अपघाताचे वृत्त कळताच पनवेल परिसरातील त्यांच्या मित्रपरिवारामध्येही शोकाकुल वातावरण आहे. राहुल हे पनवेल येथेच वास्तव्यास होते. आयटी क्षेत्रातील कंपनीत ते कार्यरत होते.

त्यांच्या अपघाती निधनाने आव्हाड कुटुंबीयांवरही मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाईक स्वार ट्रकच्या उजव्या बाजुच्या थेट टायरमध्ये घुसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना महामार्गावर घडली आहे.

दुचाकीस्वार मुंबईच्या दिशेने जात असताना चरवेली येथे घडला अपघात झाला आहे. या अपघाताचे वृत्त कळताच रत्नागिरी पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकी स्वाराला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून या अपघाताची नोंद करण्याची पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मृत्यू झालेल्या पनवेल येथील या तरुणाचे लग्न ४ डिसेंबर २०१७ रोजी झाले होते.

नुकताच लग्नाचा वाढदिवसही झाला आणि आठवडाभरातच निष्ठूर नियतीने डाव साधल्याने कुटुंबावरती दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *