दापोली : मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या गाडीला अपघात, पाच प्रवासी गंभीर

banner 468x60

मुंबई गोवा महामार्गावर पनवेल नजीक शनिवार 4 नोव्हेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास झायलो गाडीला अपघात होऊन पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पहाटे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी कडून मुंबईकडे युसुफ शहाजी हे आपल्या कुटुंबियां समवेत झायलो गाडीने मुंबईकडे प्रवास करताना पहाटे सहाच्या सुमारास पनवेल जवळ अचानक जोरदार आवाज झाला आणि गाडीचा अपघात झाल्याची माहिती युसुफ शहाजी यांनी दिली.

सर्वजण झोपेत असल्यामुळे आणि चालकालाही डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र आम्ही सर्वच झोपेत असल्याने गाडी कशावर आदळली हे आम्हाला न समजतात गंभीर दुखापत झाल्याची माहिती गाडीतील प्रवाशांनी दिली.

त्या अपघातात तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. सर्व जखमीना डी .वाय .पाटील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *