Breaking News
मोठी बातमी – TWJ घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला गुजरातमधून अटक, ठाणे पोलिसांची कोकण कट्टा न्यूजला माहिती गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, कोकण कट्टा न्यूजने वेळोवेळी लावून धरली होती बातमी, गुतवणूकदारांनी मानले कोकण कट्टा न्यूजचे आभार BIG NEWS सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री दापोली : शहरात उनाड गुरांचा हैदोस, व्यापारी आणि ग्राहक हैराण दापोली : हॉटेल कामगार महिलेचा चक्कर येऊन मृत्यू, परिसरात हळहळ चिपळूण : अवैध पशुवाहतुकीवर पोलिसांची कारवाई, 14 लाखांच्या मुद्देमालासह 7 म्हशी, एका गाईची सुटका

चिपळूण : ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे गूढ वाढले, व्हिसेराची सर्वांना प्रतीक्षा, घातपाताचा संशय

banner 468x60

सवतसडा धबधब्याच्या खडकात चैतन्या मेटकर या विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला हाेता.

मात्र, हा घातपात की, आत्महत्या याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे ‘त्या’ विवाहितेच्या मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे. पोलिसांना आता व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा असून, व्हिसेरा अहवाल प्राप्त होताच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

banner 728x90

महामार्गाच्या चौपदरीकरणातील एका कामगाराला सोमवारी (४ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता परशुराम सवतसडा येथील धबधब्याच्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह दिसला. प्रथमदर्शनी मृतदेहाचे केवळ पाय बाहेर दिसत होते. तर शरीर खडकात कोंबलेल्या अवस्थेत होते.

पोलिस तपासानंतर हा मृतदेह पेढे पायरवाडी येथील चैतन्या चंद्रकांत मेटकर या विवाहितेचा असल्याचे स्पष्ट झाले. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मृतदेहावर काही किरकोळ जखमा आहेत.

त्यामुळे ती पाय घसरून खडकात पडली असावी आणि नंतर तिला उठताच आले नसावे, असाही कयास लावला जात आहे. मृतदेहाच्या ठिकाणी हातातील बांगड्या फुटून पडलेल्या स्थितीत आढळल्या होत्या.

त्यामुळे नेमके काय झाले, प्रत्यक्षात ती धबधब्याच्या ठिकाणी का गेली होती, याचा शोध पोलिस घेत आहेत. चैतन्या मेटकर या विवाहितेच्या मृत्यूचे नेमके कारण समोर न आल्याने पोलिसही कोणत्याच निष्कार्षापर्यंत पोहोचलेले नाहीत.

शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून मृत्यूचे कारण पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुणे येथे तपासणीसाठी पाठवलेल्या व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे मूळ कारण समोर येणार आहे. चैतन्या ही आपल्या सासरच्या लोकांबरोबर येथे राहत होती. तिचा पती मुंबई येथे नोकरीला आहे.

मृत्यूच्या एक दिवस अगोदर माहेरला जाते, असे सांगून ती घरातून निघाली होती. विशेष म्हणजे आपला मोबाइल तिने घरातच ठेवला होता. माहेरला जाताना तिने मोबाइल सासरी का ठेवला, याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी सर्व शक्यतांची पडताळणी करून तपासला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *