खेड : कोकण कट्टा न्यूज इम्पॅक्ट, नदीचे पाणी दूषित केल्याप्रकरणी लोटेत 3 कंपन्यांवर गुन्हा दाखल, ग्रामस्थांनी मानले कोकण कट्टा न्यूजचे आभार

Screenshot

banner 468x60

लोटे एमआयडीसी परिसरातील तीन कंपन्यांनी नदीचे पाणी दूषित केल्याचा आरोप असून याप्रकरणी कोतवली ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षता तांबे यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

https://www.instagram.com/reel/DQjOLd4jfaA/?igsh=NWVhZnZoeTJzcnFp

https://www.facebook.com/share/v/1DDdLDRmv3/?mibextid=wwXIfr

तक्रारीच्या आधारे योजना ऑर्गॅनिक्स, पुष्कर केमिकल्स आणि श्रेष्ठा ऑर्गॅनिक या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२५ ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संबंधित कंपन्यांनी सोनपात्रा नदीमध्ये दूषित सांडपाणी सोडल्याचे निष्पन्न झाले आहे.
या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिक, जनावरे आणि वन्यजीव यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून मासेमारी व्यवसाय तसेच शेतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

नदीचे पाणी पिण्यायोग्य न राहिल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
परिसरात पर्यावरणीय संतुलन बिघडल्याची गंभीर बाब लक्षात घेता पोलिसांनी संबंधित कंपन्यांविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *