Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता, विसापूरमधील घटनेने खळबळ

banner 468x60

दापोली तालुक्यामधील विसापूर येथून एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची परिस्थिती नाही ना,याचा तपास सुरू आहे.

banner 728x90 banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

दरम्यान,एका घरातील चारजण बेपत्ता झाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी विसापूर येथून भरत भेलेकर (वय- 34) हा दुपारी 2.30 च्या सुमारास त्याचा चुलत भाऊ सहदेव भेलेकर यांच्याबरोबर दुकानात जातो,असे सांगून निघून गेला.

सहदेव हा दुकानात पोहोचला मात्र भरत हा दुकानात आला नाही.काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्याची सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. तरीही तो आढळून आला नाही.भरत याचे अन्य नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडे शोध घेतला असता तो आढळून न आल्यामुळे पांडुरंग भेंलेकर यांनी दापोली पोलीस स्थानकात भरत बेलेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

याच कुटुंबातील भरत याची पत्नी सुगंधा भेलेकर ही 3 जुलै रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते,असे सांगून आराध्य(वय-7) व श्री (वय-4) या मुलांना घेऊन मुगीज शाळा नंबर 1 या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे निघून गेली.सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्यामुळे मुलांचा व सुगंधा हिचा सगळीकडे शोध घेण्यात आला,मात्र ती कोठेही आढळून आली नाही.

तिच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडे चौकशी केली असता तिचा कोणताही तपास लागला नाही. तसेच दूरध्वनीवरही संपर्क होत नसल्यामुळे सुगंधा भालेराव बेपत्ता झाल्याची तर आराध्य व श्री या दोघांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात देण्यात आली आहे.

या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करत आहेत.एकाच घरातील चौघेजण बेपत्ता झाल्यामुळे यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची परिस्थिती नाही ना,याचा तपास करण्याचे आव्हान दापोली पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *