मे महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्यात घरे, गोठे यांचे ३१ लाख ८९ हजार ५४४ रुपयांचे नुकसान केले आहे. या कालावधीत वीज पडून एक व्यक्ती मृत्यू पावली तर सहा जखमी झाले आहेत.
तसेच रत्नागिरी तालुक्यात भिंत पडून आणि गुहागर तालुक्यात झाड पडून ३ जण जखमी झाले. यंदा मे महिन्यातच ऐन उन्हाळ्याच्या कालावधीत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह पडलेल्या या पावसाने जिल्ह्यात अतोनात नुकसान केले आहे.
तसेच शेतमळ्यांमध्ये पाणी भरल्याने आता पेरणी कशी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मे महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यापासून पावसाने जिल्हाभर जोरदार हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरूवातीपासून सलग सुरू झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यात ८ पक्क्या घरांचे पूर्णत: १,०९,८५० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. ५२ पक्क्या घरांचे २४ लाख ९९ हजार ३९४ रुपयांचे नुकसान केले आहे.
या पावसाने गोठ्यांचेही नुकसान केले आहे. जिल्ह्यात ४ गोठ्यांचे अंशत: २ लाख ७ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर २ गोठ्यांचे पूर्णत: ३,७३,५० रुपयांचे नुकसान केले आहे. लांजा येथे वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
तर ६ जण जखमी झाले. तसेच रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी येथे संरक्षक भिंत पडून ३ जण जखमी झाले. तर गुहागर तालुक्यातील आबलोली येथे झाड पडून ३ जण जखमी झाले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*