चिपळूण : लोकसभेसाठी अनंत गीते पुन्हा मैदानात !

banner 468x60

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

शेकापच्या मदतीने ते पुन्हा या मतदारसंघात नशीब आजमावणार आहेत. खेड, दापोली आणि मंडणगडमध्ये त्यांनी पुढील महिन्यात मेळाव्यांचे नियोजन केले आहे. गीते यांनी रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या विरोधात मागील निवडणूक लढवली होती.

त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गीते राजकारणात सक्रिय नव्हते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे पुढील निवडणुकीत गीते यांना संधी मिळणार नाही. रायगडमधून महाविकास आघाडीतर्फे सुनील तटकरे यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता मानली जात होती.

एक वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनंत गीते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी रायगडसह मुंबईमध्ये पक्षाचे मेळावे घेत कार्यकर्त्यांशी संपर्क मोहीम सुरू केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडला असला तरी कार्यकर्ते आपल्याबरोबर राहतील. मित्रपक्षाबरोबर आघाडी न करता स्वतंत्र निवडणूक लढवावी, असा आग्रह गीते यांचा नेहमी होता;

परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. तटकरेंसह राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपबरोबर गेले. त्यामुळे गीते यांचा रायगडमधील लोकसभेच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड लोकसभा मतदार संघात गीते यांचा कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे.

या मतदारसंघात शेकापची ताकद आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी तसेच खासदार तटकरे यांनी पक्षाबरोबर गटारी केली आहे; मात्र कार्यकर्ते आणि मतदार अजूनही पक्षाबरोबर एकनिष्ठ असल्याचा दावा केला जात आहे. या सर्व जमेच्या बाजू गृहित धरून गीते पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. नुकतेच त्यांनी पाली ( रायगड ) येथील बल्लाळेश्वर देवस्थानचे दर्शन घेऊन आपल्या निवडणुक प्रचाराला सुरवात केली.

पालीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. फुटलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर त्यांनी जोरदार टीका केली. आता त्यांचे लक्ष रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यावर आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये पुढील महिन्यात गीते यांनी मेळाव्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू झाले आहे.

खासदार सुनील तटकरे यांना दुर्बुद्धी सुचली आणि ते भाजपबरोबर गेले. त्यांनी निवडणुकीला उभे राहू नये. जर का ते उभे राहिले तर मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील. पुढील महिन्यात मी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. माझा लोकसभेचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे.

  • अनंत गीते, माजी खासदार
banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *