कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा अलर्ट दिला असताना काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहे.

रत्नागिरीतील राजापूरला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरड बाजूलाकरण्याचं कामयुद्धपातळीवर सुरू आहे.

रात्री अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद आहे, असं राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी माहिती दिली आहे. वाहतूक आंबा घाटमार्गे वळवल्याचं पोलिसांनी सांगितलं.
याठिकाणची वाहतूक सुरळीत होण्यासाठी सकाळ किंवा दुपार होण्याची शक्यता आहे. (ही बातमी आम्ही आताच ब्रेक केली आहे बातमीची जशी माहिती मिळेल तशी अपडेट करू )

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













