गुहागर : आगारातून लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या बंदच

banner 468x60

गुहागर आगारातून लांब पल्ल्याच्या काही बसफेऱ्या बंदच आहेत. या बाबत कोकण प्रवासी संघटनेचे अनिलकुमार जोशी यांनी गुहागर आगारप्रमुख व विभाग नियंत्रक कार्यालय रत्नागिरी येथे संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

गेले सहा महिने लांब पल्ल्याच्या गुहागर आगाराच्या तुळजापूर, अक्कलकोट, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर या बसफेऱ्या बंदच आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

गुहागर आगार व रत्नागिरी जिल्हा विभाग नियंत्रक कार्यालयास वारंवार कळवूनही कारभार ढिम्मच आहे. ज्येष्ठ पत्रकार व प्रवासी संघटनेचे अनिलकुमार जोशी यांनी याबाबत गुहागर डेपो मॅनेजर कांबळे यांच्याकडे संपर्क साधला असता बसफेऱ्या सुरू झाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.


सध्या गाड्यांची संख्या व २०० कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शाळा चालू असल्याने एसटी गाड्या तिकडे वापरल्या जातात. १५ एप्रिलनंतर तुळजापूर, अक्कलकोट, पिंपरी- चिंचवड, कोल्हापूर सुरू होतील, असे रत्नागिरी विभाग नियंत्रक कार्यालयाकडून कळवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *