दापोली तालुक्यातील बुरोंडी गावातील नदीवरील पुलाचा अर्धा भाग मुसळधार पावसामुळे पुराच्या प्रवाहात वाहून गेला आहे. हा पूल दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा होता. अर्धा पूल वाहून गेल्याने नागरिक विशेषतः महिला, वृद्ध आणि शालेय विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.
बुरोंडी व आसपासच्या गावांना जोडणारा हा पूल पावसाळ्यात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सध्या पूल नसल्याने नागरिकांना लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. या पुलासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी निधी मंजूर करून काम सुरू केले होते.
मात्र हा पूल बंधारा टाईप पद्धतीचा असल्याने त्याच्या टिकाऊपणाबाबत गावकऱ्यांकडून शंका व्यक्त होत आहेत. पूल पुरात वाहून गेल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे.
गावकऱ्यांनी या पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















