चिपळूणमधील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान गडनदीवरील पुलाचे काम सुरू असताना आरवली येथील विसर्जन घाट उद्ध्वस्त झाला आहे .
या घाटाचा उपयोग करून चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील भाविक गणेश विसर्जन करत होते.
पुलाखालील घाट उद्ध्वस्त झाल्याने विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.
भाविकांना पर्यायी सोयीअभावी अडचणींचा सामना करूनच गणपती विसर्जन करावे लागले.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी घाटाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आगामी विसर्जनावेळी आणखी मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*