खेड : खवले मांजर शिकार आणि खवलं तस्करी प्रकरणी पाचजण ताब्यात; एका महिलेचा समावेश

banner 468x60

तालुक्यातील लोटे येथे दि. २५ रोजी खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना दापोली व चिपळूण वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

खवल्यांच्या तस्करी प्रकरणी आणखी तिघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्या पैकी तिघांना न्यायालयात हजर केले असता दि.३० पर्यंत न्यायालयाने वन विभागाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

याप्रकरणी आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. संशयितांत एका महिलेचा देखील समावेश असून मुंबई येथील एकाला अटक केली आहे, अशी माहिती वनविभागाचे दापोली परिक्षेत्र वनअधिकारी पी. जी. पाटील यांनी शुक्रवारी ( दि.३०) रोजी खेड येथे पत्रकार परिषदेत दिली.

मिलींद वसंत सावंत ( वय ५५ राहणार मालाड, मुंबई), सौ. मिना मोहन कोटिया (वय ६२ राहणार लोटे, ता. खेड), राजाराम पगारे (वय ६८, रा.मुंब्रा, मुंबई), योगेश युवराज निकम (वय २७, रा. बीजघर कातकरी वाडी) व श्रीकांत तानाजीराव भोसले (वय ५७, रा. बीजघर मावळतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, खेड तालुक्यातील लोटे येथे रविवारी (दि.२५ ) रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास महामार्गावर दोन संशयित व्यक्ती आढळून आले. अधिक चौकशी केली असता सदर दोन व्यक्तींच्या बॅगेमध्ये खवले मांजराची खवले असल्याचे आणि ते विक्रीसाठी तेथे आले असल्याची माहिती मिळाली. यानंतर दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. यामध्ये

मिलींद वसंत सावंत व सौ. मिना मोहन कोटिया या दोघांकडून खवले मांजर या प्राण्याचे ०.९३० किलोग्रॅम इतके खवले जप्त केले आहेत. सदर दोन्ही आरोपींना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर दि.२८ रोजी मुंबईतील मुंब्रा येथून राजाराम पगारे याला वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दि.३० पर्यंत वन विभागाच्या कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *