रत्नागिरी : हातखंबा येथे ट्रकची रिक्षाला धडक, तीन प्रवासी जखमी

banner 468x60

मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा येथे सोमवारी सकाळी ट्रकच्या धडकेत रिक्षा उलटून तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

banner 728x90

रत्नागिरीकडे येणाऱ्या रिक्षाला (एमएच ०८ बीसी १२१९) मागून आलेल्या ट्रकने (एमएच ०८ एपी ०७११) जोरदार धडक दिली. धडकेमुळे रिक्षा रस्त्यावर उलटली. या अपघातात चंद्रकांत रामचंद्र कांबळे (५०), मानसी चंद्रकांत कांबळे (४६) आणि नीतेश गंगाराम कांबळे (४०, तिघेही रा. हसोळ, बौद्धवाडी, ता. लांजा) हे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच आरटीओ विभागातील पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *