लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती.
अखेर सायंकाळी 5:45 नंतर आंजणारी पुलावरील वाहतूक सुरु झाली आहे. लांजा तालुक्यातही पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पाणी भरले आहे.पुराचे पाणी शेतात शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आज दुपारी साडेतीन वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता .
पुल बंद झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता आंजणारी पुलावरील वाहतूक सुरु झाली आहे.


वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













