रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेले मनोरुग्णालय कोल्हापुर निपाणी येथे स्थलांतरित करण्याचा डाव सुरू आहे.
पण याद राखा, रत्नागिरीतील मनोरुग्णालय पळवण्याचे हे कारस्थान पूर्ण ताकदीनिशी हाणून पाडू, वेळ पडल्यास जनआंदोलन उभे करू
असा थेट इशारा राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिला आहे.पश्चिम महाराष्ट्राला आवश्यकता असेल तर त्यांनी जरूर नवीन रुग्णालय मंजूर करून घ्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालय स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.त्यासाठी वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत, महाराष्ट्र सरकारने देखील तशी तयारी दाखवली असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
अशी माहिती देखील पुढे येत आहे.प्रत्यक्षात म नोरुग्णालयाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन लवकरच प्रस्तावित आहे. मग असे असताना थेट मनोरुग्णालय स्थलांतरित करण्याचे कारस्थान कोणाचे असा प्रश्न शौकत मुकादम यांनी उपस्थित केला आहे.
शौकत मुकादम म्हणाले यापूवींच जिल्ह्यातील काही कार्यालये इतर ठिकाणी हलवण्यात आली आहेत. आता चक्क अत्यंत महत्वाचे असे मनोरुग्णालय थेट जिल्हाबाहेर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या टोकावर घेऊन जाण्याचा डाव आहे.
मग कोकणातील लोकांनी आणि रुग्णांनी काय करावे? येथील मनोरुग्ण पश्चिम महाराष्ट्रात जातील का? त्यांना ते परवडेल का?
म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असा हा प्रकार होणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील रुग्ण जास्त आहेत हे मान्य पण त्यासाठी रुग्णालय स्थलांतरित करणे हा कोकणावर एक प्रकारे अन्याय आहे,असेही मुकादम

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*