टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा मोठा पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषकावर नाव कोरले आहे.
या सामन्यात भारतानं बलाढ्य असा 255 धावांचा डोंगर उभा केला होता. या बदल्यात न्यूझीलंडला 159 धावा करता आल्या. भारतानं तब्बल 96 धावांची न्यूझीलंडचा पराभव केला. टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा मोठा पराभव करत 2026 च्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरले आहे. या सामन्यात भारतानं बलाढ्य असा 255 धावांचा डोंगर उभा केला होता. या बदल्यात न्यूझीलंडला 159 धावा करता आल्या. भारतानं तब्बल 96 धावांची न्यूझीलंडचा पराभव केला.
या कामगिरीनंतर भारतानं एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. 2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 255 धावा केल्या. टीम इंडियाकडून संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी अर्धशतके झळकावली. सॅमसनने 89 धावा करत संघाचा सर्वाधिक धावा काढल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील हा भारताचा दुसरा सर्वोच्च आणि टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-20 विश्वचषकात तीन वेळा 250 किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे.भारताकडून अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे यांनी वादळी खेळी केली आहे.
तर दुसऱ्या बाजूला अक्षर पटेल, बुमराह, हार्दिक पांड्याने चांगली गोलंदाडी केली. यामुळे भारतीय संघानं मोठा विजय मिळवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आज आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना भारतानं जिकंला. या सामन्यात भारताने जोरदार कामगिरी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताना 255 धावांचा पल्ला गाठला होता. यामध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं जोरदार प्रदर्शन केलं आहे. अभिषेक शर्मानं जलद अर्धसतक करत विक्रम केला आहे. शर्माच्या खेळीचं भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने कौतुक केलं आहे. अभिषेक शर्मानं 21 चेंडूत 52 धांवाची वादळी खेळी केली. तर 18 चेंडूत अर्धशतक झळकावत विक्रम केला आहे. अभिषेक शर्मानंतर, संजू सॅमसनने 2026 च्या टी-20 विश्वचषकात इतिहास रचला. सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 89 धावांची वादळी खेळी केली. टी 20 विश्वचषकातील सलग तीन सामन्यात 50 च्या वर धावा करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने विरोट कोहलीची बरोबरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह धमाका आणि अक्षय पटेलच्या फिरकीची जादू चालली. बुमराहनं 4 षटकात फक्त 15 धावात 4 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या बाजूला अक्षर पटेलने 3 षटकात 27 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्याचबरोबर हार्दीक पांड्यासह अभिषेख शर्मा आणि वरुन चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. सर्वच गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं. त्यामुं भारताला ऐतिहासीक विजय मिळवलं आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














