शाळेत गरबा नृत्य खेळत असताना चक्कर येऊन पडल्याने वैष्णवी प्रकाश माने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद असलेले पाचल येथील सरस्वती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक तानाजी विठोबा देसाई यांना तत्काळ निलंबित करून पदमुक्त करण्याचे आदेश कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाला दिले आहेत.
दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी गरबा नृत्य कार्यक्रमाच्या दिवशी पाचलमधील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी वैष्णवी माने हिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वैष्णवीचे वडील प्रकाश माने यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे वैष्णवीच्या मृत्यूला शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन जबाबदार असून, त्यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची तसेच मुख्याध्यापक देसाई यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती.
तक्रारीनुसार देसाई यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी देसाई यांना तत्काळ निलंबित करून पदमुक्त करण्याचे आदेश पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाला दिले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













