संगमेश्वर तालुक्यातील गोळवली आमकर वाडी येथे रविवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले असून सध्या तरी यामुळे कोणतीही हानी झाली नसली, तरी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
रविवारी रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी पार केली असून,
संगमेश्वर मधील शास्त्री नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ बाजारपेठ पूर्णतः जलमय झाली आहे.
संगमेश्वर नायरी मार्गावर कसबा येथे पुराचे पाणी आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी आज पावसाने थैमान घातल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे देखील अवघड झाले होते.
शाळांनी आयोजित केलेल्या प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमावर पावसाने व्यक्ती आणला. तर गोळवली आमकरवाडी येथे भूस्खलनाची घटना घडली असून सुदैवानं जीवितहानी झालेली नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*