रत्नागिरी : ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी : ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू रत्नागिरी येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बाव नदीजवळ सळई वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला.

banner 728x90

या भीषण अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरून पोलिस सुत्रांनी दिली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे.

वेगवेगळ्या स्तरावर याबाबत ओरड सुरू आहे. कालपासून बांधकाम मंत्र्यांकडून रखडलेल्या या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील सुरू झाली आहे.अशातच शुक्रवारी सकाळी बावनदीनजीक ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जणांनी आपला जीव गमावला आहे.\

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *