Breaking News
मोठी बातमी – TWJ घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला गुजरातमधून अटक, ठाणे पोलिसांची कोकण कट्टा न्यूजला माहिती गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, कोकण कट्टा न्यूजने वेळोवेळी लावून धरली होती बातमी, गुतवणूकदारांनी मानले कोकण कट्टा न्यूजचे आभार BIG NEWS सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री दापोली : शहरात उनाड गुरांचा हैदोस, व्यापारी आणि ग्राहक हैराण दापोली : हॉटेल कामगार महिलेचा चक्कर येऊन मृत्यू, परिसरात हळहळ चिपळूण : अवैध पशुवाहतुकीवर पोलिसांची कारवाई, 14 लाखांच्या मुद्देमालासह 7 म्हशी, एका गाईची सुटका

रत्नागिरी पोलिसांचं आवाहन TWJ च्या सर्व गुंतवणूकदारांनी तातडीने आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी

banner 468x60

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘टीडब्ल्यूजे असोसिएट्स’ (TWJ Associates) या कंपनीविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आला आहे.

banner 728x90

या पार्श्वभूमीवर, फसवणूक झालेल्या सर्व गुंतवणूकदारांनी तातडीने आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे महत्त्वाचे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाने केले आहे.


दिनांक २२/०९/२०२५ रोजी चिपळूण पोलीस ठाणे येथे ‘टीडब्ल्यूजे असोसिएट्स’ विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २१६/२०२५, भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस. २०२३) कलम ३१६ (२), ३१८(२), ३१८(३), ३१८(४), ३(५) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या गंभीर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा अधिक तपास आता रत्नागिरी पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offence Wing – EOW) करत आहे. त्यामुळे, ‘टीडब्ल्यूजे असोसिएट्स’ कंपनीमध्ये गुंतवणूक करून ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे, अशा सर्व गुंतवणूकदारांनी विलंब न करता रत्नागिरी पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तत्काळ हजर राहावे आणि आपली रीतसर तक्रार दाखल करावी.


फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी पुढे येऊन तक्रार नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून या गुन्ह्याच्या तपासाला गती मिळू शकेल आणि आरोपींवर कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई करता येईल. रत्नागिरी पोलीस दलाचे हे आवाहन फसवणूक झालेल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *