रत्नागिरी येथील कंपनीतील आर्थिक व्यवहारातील अडचणींचा
फायदा घेऊन मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करून १ लाख २० हजारांची खंडणी घेतल्याचा प्रकार समार आला आहे.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पालिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमाल श्रीनाथ, साईश मयेकर आणि शेखर नलावडे (सर्व रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
रत्नागिरी एमआयडीसी येथील एका कंपनीतील मालाची विक्री हात नसल्याने, तसेच कंपनीत काही ला कांचे वेतन देणे बाकी आहे. या कंपनीतील काही लाकांनी काम साडून दिल्याने ही कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे.
या अडचणींचा फायदा घेऊन मनसेच्या अमाल श्रीनाथ, साईश मयेकर व शेखर नलावडे या तीन पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात येऊन दमदाटी करून कंपनी बंद पाडण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अमाल श्रीनाथ याने कंपनीतील एकाकडून एक लाख रुपये घेतले, तसेच कंपनीतील एका महिला गुंतवणूकदाराकडून दानवेळा प्रत्येकी दहा हजार असे एकूण १ लाख २० हजार रुपये जबरदस्ती करून खंडणी घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पालिसांनी तिघांवर भारतीय दंड विधान कायदा कलम ३८४, ३८५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













