रत्नागिरी येथील साळवी स्टॉप परिसरातील जलतरण तलावाजवळील चहाच्या टपरीवर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ट्रकचालकाला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यात सतीश बब्रुवान नायकवडी (55, रा. साळवी स्टॉप) जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी सतीश नायकवडी चहा घ्यायला त्या टपरीवर गेले होते. त्याचवेळी तिथे ट्रान्स्पोर्ट कंपनीचा मॅनेजर आणि ट्रकचालक महेश घाटगे हे जमीन व्यवहारासंदर्भात चर्चा करत होते. या चर्चेदरम्यान नायकवडी यांनी ‘जमीन त्याच्या नावावर करा’ असा सल्ला दिल्याने वाद निर्माण झाला.
या क्षुल्लक कारणावरून संशयित यदुनाथ बाईग यांनी नायकवडी यांना ढकलाबुकल करत मारहाण केल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि नाकाला दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत नायकवडी स्वतः रिक्षाने जिल्हा रुग्णालयात पोहोचले.
घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















