राजापूर तालुक्यातील हातीवले-आरेकरवाडी परिसरामध्ये वीज पडल्याची घटना घडली. चिरेखाणीवर काम करणारे पाच कामगार जखमी झाले आहेत.
सर्व जखमी कामगारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. मागील काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्याने तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान झाले आहे.
अशातच आज सायंकाळीदेखील ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यामध्ये हातीवले-आरेकरवाडी परिसरात वीज पडल्याची घटना सायंकाळी उशिरा घडली. त्या परिसरातील चिरेखाणीवर काम करणारे पाच कामगार जखमी झाले.
त्यांना तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी येथील राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तालुक्यात परतीचा पाऊस सुरू असताना गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वीज पडून नुकसान झाल्याची घटना घडल्याने नागरिकांत काहीसे भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













