राजापूर : विजेचा धक्का लागून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

banner 468x60

शहर बाजारपेठेत विद्युत पोलवर काम करताना विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या संतोष रामचंद्र वरक (वय-28, रा. नाणार, मयेकर मांगर) या महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

आज, मंगळवारी ही दुदैवी घटना घडली. संतोष हा सकाळी शहर बाजारपेठेत विद्युत पोलवर काम करीत असताना विजेचा धक्का बसून खाली कोसळला. यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

banner 728x90


घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी राजापूर ग्रामिण रूग्णालयात धाव घेतली. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *