रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल जोशी यांचे चिरंजीव, गुहागर तालुक्यातील नरवण सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देऊन गोरगरीब रुग्णांकरिता आधारवड ठरलेले डॉ. शंतनू जोशी, नरवण यांचे सोमवारी सायंकाळी 4.30 वाजता पुणे येथे उपचार घेत असताना निधन झाले.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
डॉक्टर अनिल जोशी यांच्याप्रमाणेच त्यांचे चिरंजीव डॉक्टर शंतनु जोशी यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला रुग्णसेवा दिली आहे.
त्यांना काही दिवसापूर्वी ताप आल्याने उपचाराकरिता डेरवण येथे दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीही योग्य निदान होत नसल्याने त्यांना पुणे येथील मंगेश कर हॉस्पिटलमध्ये अधिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते
उपचार घेत असताना त्यांना हृदयविकाराचा आघात असल्याने यामध्येच त्यांचे निधन झाले. त्यांची अंतयात्रा नरवण येथून आज मंगळवार दि.26 सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता निघणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*