रत्नागिरी : जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सोमवारी शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.पुढील 2 ते 3 तास रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यासाठी महत्वाचे आहेत. कारण पुढील 2 ते 3 तासात या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशार हवामान विभागानं दिला आहे. 

काही भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. हे लक्षात घेता काही गावांमधील भागात पाणी आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये तसेच पूर्व दक्षता म्हणून उद्या सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासानाकडून घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *