रत्नागिरी : जिल्ह्यात 10 जूनपर्यंत मनाई आदेश

banner 468x60

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

banner 728x90 banner 728x90

त्यावेळी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनाई आदेश लागू करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले. जिल्ह्यात २७ मे ते १० जून या कालावधीत फौजदार प्रक्रिया संहिता कायदा १९७३ चे कलम १४४ नुसार मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

निकालानंतर एखाद्या घटनेने तणाव निर्माण होऊन त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

मतमोजणी शांततेत व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगणे फिरण्यास आली आहे. व बरोबर घेऊन मनाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *