चिपळूणमध्ये सध्या पाणीबाणी सुरु आहे. पाण्यावरून गावोगावी भांडणे सुरू आहेत. चिपळूणमधील नारदखेरकी येथे ग्रामपंचायत शिपायाला मारहाण झाली आहे.
पाणी कधी सोडणार, याचा जाब विचारला म्हणून ग्रामपंचायतीच्या शिपायाला मारहाण करण्यात आली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
नारदखेरकी येथे ३ मे रोजी गावातील जयंत जाधव यांच्या घरी पाण्याच्या विषयावरून बैठक सुरू होती. या दरम्यान ग्रामपंचायतीचे शिपाई चंद्रकांत जाधव हे जेवण करण्यासाठी बसले होते.
यावेळी शांताराम बामणे, दत्ताराम बामणे, अशोक जाधव, रघुनाथ चाळके यांनी चंद्रकांत जाधव यांना पाणी कधी सोडणार, याबाबत जाब विचारत त्यांना मारहाण केली.
या मारहाणीत जाधव यांच्या कानाचा पडदा फाटला आहे. संशयितांनी त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















