खेड : वांद्रे- मडगाव एक्सप्रेसला खेड थांबा नाही, योगेश कदमांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

banner 468x60

मुंबईच्या उपनगरातून थेट कोकणात मडगाव पर्यंत सुरू झालेली ही पहिली रेल्वे आहे. त्यामुळेच रेल्वेला खेड येथे थांबा मिळेल अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र अपेक्षाभंग झाला आहे आता या नाराजीला शिवसेनेचे दापोली खेड मंडणगडचे आमदार योगेश कदम यांच्या पत्राने वाचा फोडली आहे.

banner 728x90

यासंदर्भात थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून आपली नाराजी स्पष्टपणे कळवली आहे. रत्नागिरी आणि चिपळूण असे दोनच थांबे रत्नागिरी जिल्ह्यात देण्यात आले आहेत. यावरूनच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार योगेश कदम त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना थेट पत्र लिहून खंत व्यक्त केली आहे.

कदम म्हणाले, खेड थांब्याचा समावेश केल्यास त्यानंतर खेड थांब्याचा समावेश करण्यासाठी लागणारी अवघड प्रक्रिया टाळता येईल. CC-२९८/२०२४ दिनांक २७/०८/२०२४ ही रेल्वे सेवा वांद्रे, बोरिवली आणि कोकण रेल्वेच्या विविध गंतव्यस्थानांदरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे आश्वासन देत असताना, अंतिम मंजुरीमध्ये रत्नागिरी जिल्हयातील खेड, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यांना जोडणारे महत्वपुर्ण असलेल्या खेड स्थानकाचा समावेश नाही याबद्दल खेद व्यक्त करण्यात आली आहे.

ही रेल्वे सुरू करण्यात आल्याबद्दल धन्यवाद देताना आपल्या या मागणीचा आपण विचार करून आपण योग्य असा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आमदार योगेश कदम यांनी दिलेल्या पत्रामधून व्यक्त केली आहे. खेड येथे जादा रेल्वे सेवेची जोरदार आणि सातत्यपुर्ण मागणी होती. नव्या ट्रेनमुळे ही गरज पूर्ण होईल, अशी आशा अनेकांना होती.

अंतिम मंजुरीमध्ये खेड येथे थांबा वगळणे ही बाब निराशाजनक आहे. महत्वाच्या स्थानकावरुन प्रवास करणाऱ्या संभाव्य फायद्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा स्पष्टपणे या पत्रात नमूद करण्यात आला आहे. सेवेच्या प्रारंभापासून खेड येथे थांबा समाविष्ट केल्याने मोठया संख्येने प्रवाशांसाठी तिची सुलभता आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढेल.

हा थांबा आत्ता लागू केल्यास नंतरच्या तारखेला अतिरिक्त थांब्यांची विनंती करण्याची अवघड आणि अनेकदा लांबलचक प्रक्रिया टाळता येईल असे कदम म्हणाले आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *