राज्याच्या महाधिवक्ता पदासाठी चिपळूण तालुक्यातील मालघर गावचे सुपुत्र आणि वरिष्ठ विधीज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. मात्र, नव्या नियक्तीपर्यंत जबाबदारी सांभाळण्याची विनंती सरकारने त्यांना केली होती.
त्यानुसार ते कार्यभार पाहत होते.
मिलिंद साठे हे मुंबई उच्च न्यायालयातील अनुभवी आणि प्रतिष्ठित वरिष्ठ वकील म्हणून ओळखले जातात. विविध महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी प्रभावीपणे बाजू मांडली असून त्यांचा समृद्ध अनुभव राज्य सरकारला मोठा उपयोग ठरेल, असा विश्वास मंत्रिमंडळातील सदस्यांनी व्यक्त केला आहे.
मालघर–चिपळूण येथील विधीज्ञ राज्याच्या सर्वोच्च कायदे पदावर विराजमान झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे. स्थानिक पातळीवर ही नियुक्ती हा मोठा गौरवाचा क्षण मानला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













