Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : मनसेच्या 3 पदाधिकाऱ्यांवर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी येथील कंपनीतील आर्थिक व्यवहारातील अडचणींचा
फायदा घेऊन मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करून १ लाख २० हजारांची खंडणी घेतल्याचा प्रकार समार आला आहे.

banner 728x90

याप्रकरणी रत्नागिरी शहर पालिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमाल श्रीनाथ, साईश मयेकर आणि शेखर नलावडे (सर्व रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

रत्नागिरी एमआयडीसी येथील एका कंपनीतील मालाची विक्री हात नसल्याने, तसेच कंपनीत काही ला कांचे वेतन देणे बाकी आहे. या कंपनीतील काही लाकांनी काम साडून दिल्याने ही कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे.

या अडचणींचा फायदा घेऊन मनसेच्या अमाल श्रीनाथ, साईश मयेकर व शेखर नलावडे या तीन पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात येऊन दमदाटी करून कंपनी बंद पाडण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अमाल श्रीनाथ याने कंपनीतील एकाकडून एक लाख रुपये घेतले, तसेच कंपनीतील एका महिला गुंतवणूकदाराकडून दानवेळा प्रत्येकी दहा हजार असे एकूण १ लाख २० हजार रुपये जबरदस्ती करून खंडणी घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी पालिसांनी तिघांवर भारतीय दंड विधान कायदा कलम ३८४, ३८५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *