Breaking News
मोठी बातमी – TWJ घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला गुजरातमधून अटक, ठाणे पोलिसांची कोकण कट्टा न्यूजला माहिती गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, कोकण कट्टा न्यूजने वेळोवेळी लावून धरली होती बातमी, गुतवणूकदारांनी मानले कोकण कट्टा न्यूजचे आभार BIG NEWS सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री दापोली : शहरात उनाड गुरांचा हैदोस, व्यापारी आणि ग्राहक हैराण दापोली : हॉटेल कामगार महिलेचा चक्कर येऊन मृत्यू, परिसरात हळहळ चिपळूण : अवैध पशुवाहतुकीवर पोलिसांची कारवाई, 14 लाखांच्या मुद्देमालासह 7 म्हशी, एका गाईची सुटका

Chiplun चिपळूण : 6 वर्ष पूर्ण झाली तरी वाशिष्ठी नदीवर बंधारा नाही

banner 468x60

वाशिष्ठी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी एमआयडीसीने २५ कोटीचा निधी २०१७ मध्ये मंजूर केला होता; मात्र नागरिकांचा विरोध असल्याचे कारण देत जलसंपदा विभागाने बंधारा बांधण्याकडे दुर्लक्ष केले.

सहा वर्षानंतर आता चिपळूण शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी वाशिष्ठी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी केली आहे. लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या मागणीची दखल त्या वेळी घेतली असती तर आज नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून तयार झाला असता, असे जाणकारांचे मत आहे.

banner 728x90

चिपळूण शहराच्या जवळहून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केली होती.

वाशिष्ठी नदीतून वाहणारे सुमारे २४ एमएलडी पाणी एमआयडीसी उचलते आणि ते उद्योजकांना पुरवते. त्याशिवाय चिपळूण शहर आणि परिसरातील गावांच्या पिण्याची पाणी योजनासुद्धा वाशिष्ठी नदीवर अवलंबून आहे.

सध्या कोयनेच्या वीजनिर्मितीवर मर्यादा असल्यामुळे वाशिष्ठी नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे निम्म्या चिपळूण शहराला मचूळ पाणीपुरवठा होत आहे. हा प्रश्न गेली कित्येक वर्षे भेडसावत आहे. वाशिष्ठी नदी कोरडी पडल्यानंतर उद्योजकांना पाणी मिळत नाही.

त्यावर उपाययोजना करण्याकरिता लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. पटवर्धन यांनी तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम, सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून २५ कोटीचा निधी मंजूर करून घेतला होता. वाशिष्ठी नदीवर बंधारा बांधण्यासाठी उद्योजक संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग, एमआयडीसी आणि इतर कार्यालयाशी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता;

मात्र वाशिष्ठी नदीवर बंधारा बांधण्यासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याचे जलसंपदा विभागाने कळवल्यानंतर ही मागणी मागे पडली. चिपळूण शहराला सध्या मचूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी साठवण्यासाठी नदीवरील जुना पूल न तोडता तेथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी आता सर्व पक्ष नागरिक करत आहेत. २०१७ मध्ये मंजूर झालेल्या बंधाऱ्याची निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झाले असते तर मागील सहा वर्षात बंदराचे काम पूर्ण होऊन चिपळूणचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला असता, असे जाणकार सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *