कोकण : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला किती धोका?
पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. ती म्हणजे खोल अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👇🏻👇🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असून याचा परिणाम केरळात धडकणाऱ्या मान्सूनवर होणार आहे. परिणामी कोकणाच्या दिशेने सरकत येणारा मान्सूनही उशिरा होणार आहे.
कोकण किनारपट्टीवर याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. परंतु, मच्छिमार बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याने केलंय.
बिपरजॉय चक्रीवादळ हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून 150 किमी अंतरावर आहे. चक्रीवादळ वेगाने उत्तरेकडे जात असल्यामुळं या वादळाचा भारताच्या पश्चिम किनारी भागांना कोणताही धोका नसल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. परंतु वादळाच्या वेगवान वाऱ्यांचा प्रभाव किनारी भागांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे.
येत्या आठ, नऊ आणि दहा जून रोजी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाची दिशा काय?
हे वादळ आग्नेय अरबी समुद्रावर येऊन धडकलं
हे चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम नैऋत्य किनाऱ्यापासून 920 किमी अंतरावर आहे
मुंबईच्या दक्षिण-नैऋत्यपासून 1120 किमी अंतरावर
पोरबंदरच्या दक्षिण भागापासून 1160 किमी अंतरावर
पाकिस्तानातील दक्षिण कराचीपासून 1520 किमी अंतरावर
अरबी समुद्रात खोलवर हे चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीवर याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. तसंच, चक्रीवादळामुळे येणाऱ्या पावसाचीही शक्यता नाही. परंतु, मच्छिमार बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मच्छिमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. चक्रीवादळ्याच्या सध्याच्या गतीनुसार हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने घोंघावत जात आहे. त्यामुळे भारतीय समुद्र किनाऱ्यांना या वादळाचा धोका नसल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलंय..
हे वादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. तर, पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर पुढील २४ तासांत चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, मुंबई, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्यांचही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
चक्रीवादळ कसं तयार होतं?
गेल्या दोन वर्षांमध्ये चक्रीवादळं मुंबईजवळून गेल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. 2020 साली निसर्ग या चक्रीवादळाचा तडाखा कोकणाला बसला होता. त्यापूर्वी 2009 साली कोकणात फयान नावाचं चक्रीवादळ आदळलं होतं.
आपल्या कोकण-मुंबईजवळ येणारी ही चक्रीवादळं तयार कुठे आणि कशी होतात?.
पृथ्वीच्या मध्यभागी विषुववृत्त आहे. म्हणजे इक्वेटर. त्याच्या उत्तरेला 23.5 अंशांवर कर्कवृत्त आणि दक्षिणेला मकरवृत्त आहे हे तुम्हाला माहिती आहे. शाळेतलं भूगोलाचं पुस्तक आठवतंय? विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या या भागाला उष्णकटीबंधीय प्रदेश म्हणतात. म्हणजेच ट्रॉपिकल रीजन.
इथं सूर्याची किरणं थेट पडत असल्यामुळं इथल्या समुद्राचं पाणी जास्त तापतं. आता पाणी जास्त तापलं की त्याची वाफ होते. गरम हवा, वाफ ही आपली जागा सोडून वरवर जाते हे तुम्हाला माहीत आहेच. आता ही हवा वर गेल्यामुळे समुद्राजवळ दाब कमी होतो.
हा कमी दाबाचा प्रदेश तयार झाल्यावर आजूबाजूच्या प्रदेशातली हवा ती पोकळी जागा भरण्यासाठी येते.
ही प्रक्रिया सतत सुरू असते. म्हणजे कमी दाबाच्या केंद्राभोवती जास्त दाबाच्या प्रदेशातले वारे पिंगा घालू लागतात. हळुहळू या वाऱ्यांचा वेग आणि गती वाढत जाते आणि एक चक्र तयार होतं.
चक्रीवादळाची दिशा कशी बदलते?
पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एकदा फिरते. याला परिवलन म्हणतात. यामुळे पृथ्वीच्या फिरण्यामुळे आणि वाऱ्याच्या दिशेनुसार चक्रीवादळाचा प्रवास सुरू होतो.
ही वादळं अनेक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकतात. त्यांच्या जन्माची ठिकाणं आणि नेमका प्रवास सांगता येणं कठीण असलं तरी अंदाज बांधता येऊ शकतो.
जसं दरवर्षी हिवाळ्यात आंध्र-ओडिशाच्या दिशेने एक तरी चक्रीवादळ येतंच. किंवा अमेरिकेत फ्लोरिडामध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठं चक्रीवादळ येतंच येतं.
मुंबई आणि कोकणाला चक्रीवादळांचा धोका वाढलाय का?
अरबी समुद्रात चक्रीवादळ आलं तरी ते थेट मुंबईवर येऊन धडकण्याची शक्यता फार कमी असते.
“उत्तर गोलार्धातले विषुववृत्तीय वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजेच मुंबईकडून समुद्राकडे वाहतात. त्यामुळे आलेलं चक्रीवादळ पुढे सरकून गुजरातच्या किनारपट्टीवर आदळतं. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली तरी अशी वादळं मुंबईपासून अनेकदा दूर जातात..
पृथ्वीवरच्या कुठल्याही समुद्रातील वादळांचा विचार केला, तर साधारण हेच चित्र दिसतं. पण अरबी समुद्रातलं वादळ मुंबईवर थेट आदळलं नाही, तरी मुंबईत आणि कोकणात मोठं नुकसान करू शकतं, हे 2009 साली फयान आणि यंदा तौक्ते या चक्रीवादळांनी दाखवून दिलं आहे.
सागरी उधाण आणि जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे या शतकभरात मुंबईत समुद्राची पातळी 1.8 मीटर इतकी वाढेल, असाही संशोधकांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कमी तीव्रतेचं चक्रीवादळही शहरात आणि कोकण किनारपट्टीवर मोठं नुकसान करू शकतं.
त्यानंतरच्या वीस वर्षांत हवामान विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे आता मोठी वादळं येऊनही तुलनेनं नुकासन कमी होताना दिसतं. पण थेट मुंबईला एखादं वादळ येऊन धडकलं, तर मोठं नुकसान होण्याची भीती कायम आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*